शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

साखरेबरोबरच बगॅस, मोलॅसीसचे दर गडगडले : कारखान्यांसमोर अडथळ्यांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:07 IST

सांगली : साखरेचे दर सध्या वाढू लागले असले तरीही बगॅस, मोलॅसीस, इथेनॉल, को-जनरेशन या उपपदार्थांचेही दर पंधरा दिवसांत घटले आहेत.

अशोक डोंबाळे ।सांगली : साखरेचे दर सध्या वाढू लागले असले तरीही बगॅस, मोलॅसीस, इथेनॉल, को-जनरेशन या उपपदार्थांचेही दर पंधरा दिवसांत घटले आहेत. प्रतिटन बगॅसचे २२०० वरुन १६९० रुपये, मोलॅसीसचे ६५०० रुपयांवरुन ३५०० रुपयांपर्यंत दर गडगडले आहेत. साखर उद्योग अडचणीत येण्यास व्यापाºयांचा मनमानी कारभार आणि साठेबाजी कारणीभूत असल्याचा जाणकारांचा आरोप आहे. याकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू झाले त्यावेळी प्रतिक्विंटल साखरेला ३६०० रुपये दर होता. नोंव्हेंबर, डिसेंबर २०१७, जानेवारी २०१८ अशा तीन महिन्यांच्या कालावधित साखरेचे दर कमीच होत आहेत. दि. ६ फेब्रुवारीला तो दर प्रति क्विंटल २८०० रुपयांपर्यंत खाली आला होते. केंद्र आणि राज्य शासनाने साखर खरेदीसह आयात शुल्कात वाढ केल्यामुळे साखरेचे दर वाढू लागले आहेत. सध्या प्रति क्विंटल ३२०० रुपयांपर्यंत साखरेचे दर पोहोचले आहेत. दराच्या वाढीचा विचार न करताच कारखानदारांनी एकत्रित येत दोन दिवसांपूर्वी प्रतिटन २५०० रुपये पहिली उचल देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. दर कमी होत असले तरीही एफआरपी अधिक २०० ही रक्कम देण्याची घोषणा केल्याप्रमाणे देण्याचे कारखानदारांनी मान्य केले आहे.

साखरेच्या उतरत्या दरामुळे अडचणीत सापडलेल्या कारखान्यांना बगॅस, मोलॅसीस, इथेनॉल, को-जनरेशन या उपपदार्थांनी सावरले होते. तोपर्यंत गेल्या पंधरा दिवसांत बगॅसचे दर प्रतिटन २२०० रुपयांवरुन १६९० रुपये झाला आहे. प्रतिटन पाचशे रुपयांनी कारखानदारांना फटका बसला आहे. ही तूट भरुन काढण्याचेही मोठे आव्हान आहे.

मोलॅसीसचे दर प्रतिटन तीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. हंगाम सुरू झाला, त्यावेळी प्रतिटन सहा हजार ५०० रुपये होता. तो सध्या तीन हजार ५०० रुपये झाला आहे.साखर कारखाने इथेनॉलही तयार करत आहेत. तसे पाहिले तर, साखरेचे दर गडगडतात त्यावेळी ब्राझीलसारखा देश इथेनॉल निर्मितीला सर्वाधिक पसंती देतो.तेथील सरकारचेच तसे धोरण असल्याने साखरेचे दर गडगडले तरी, साखर उद्योग कधीच अडचणीत येत नाही. तेथे पेट्रोलमध्ये सक्तीने इथेनॉलचा वापरही केला जातो.को-जनरेशन प्रकल्प : दरामुळे अडचणीतविजेची टंचाई दूर करण्यासाठी को-जनरेशन (सहवीज) प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने प्रोत्साहन म्हणून ६ रुपये ५३ पैशांनी खात्रीशीर वीज खरेदीची शासनाने हमी दिली होती. म्हणूनच जिल्ह्यात असे प्रकल्प वाढले. सध्या विजेचा पुरवठा चांगला झाल्यामुळे राज्य सरकारची भूमिका लगेच बदलल्याचे दिसत आहे. गतवर्षी सरकार कारखानदारांकडून प्रतियुनिट ६ रुपये ५३ पैसे दराने वीज खरेदी करीत होते. यामध्ये प्रति युनिट २९ पैसे दर कमी होऊन तो ६ रुपये २४ पैसे प्रति युनिट झाला आहे. 

साखरेबरोबरच बगॅस, मोलॅसीस, इथेनॉलचे दर उतरले आहेत. दर उतरले असताना साखरेसह उपपदार्थांची विक्री करु नये, हे आम्हालाही कळते. पण, शेतकºयांची बिले आठ दिवसात द्यावी लागतात, त्यासाठी पैस कुठून जमा करणार आहे. तसेच भविष्यात साखरेसह उपपदार्थाचे दर वाढतील याचीही खात्री नाही. या अडचणीवर सरकारनेच ठोस आणि दीर्घ स्वरुपाचे धोरण तयार करण्याची गरज आहे- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना, कुंडलसुगीच्या दिवसात सर्वच शेतीमालाचे दर पडतात. त्यानुसारच साखर, बगॅसचे दर गडगडले आहेत. कारखानदारांनी साठे करुन ठेवावेत. आता तर २५ टक्के साखर प्रति क्विंटल ३२०० रुपयांनी खरेदीचा शासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे साखर कारखान्यांनी साखर विक्री, बगॅस, मोलॅसीस विक्रीसाठी साखर कारखान्यांनी गडबड करु नये. भविष्यात निश्चित साखरेचे दर वाढतील- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली